मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. मोड आलेले कडधान्य खाण्याचे काय फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात.पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी नंतर उडीद आणि हरभरा, ही कडधान्यही पचायला हलकी असतात.

१०० ग्रॅम कडधान्यामध्ये १७  ते २५ टक्कयापर्यंत प्रथिने असतात, आपण शाकाहारी असाल तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची पुर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. 

कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, लवणे आणि मेद यांची एकत्रीत उपलब्धता हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि म्हणूनच कडधांन्याना आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.

मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फायटीक अ‍ॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.

मोड आलेली कडधान्य मध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात. मोड आलेलं कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो. मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असतं.